प्रत्येक मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी गुरुजनांनी केलेले मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे समाजात गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे. जो चांगल्या विचाराने मार्गदर्शकाची भूमिका निभावतो त्या सर्वांनाच गुरु मानले जाते असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले.शिरटी (ता शिरोळ) येथे ग्रामपंचायत आणि वंदे मातरम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी गावातील सर्व …