कुंभोज (ता. हातकणंगले) कुंभोज–हातकणंगले रोडवरील झालेल्या भीषण अपघातात सानिका संजय सपकाळ व आनंदराव जाधव यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोषींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. चौकशीला होत असलेल्या विलंबाचा निषेध म्हणून कुंभोज ग्रामस्थांनी आज शांततेत मूक मोर्चा काढला. मात्र मोर्चादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि घोषणांमुळे हा मूक मोर्चा पुढे जनआक्रोश बनण्याची चिन्हे दिसत आहेत.चार दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी–चारचाकी …