कागल /प्रतिनिधीमहात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट घातल्यामुळे 90 टक्के लाभार्थी शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांची ही घोर फसवणूक असून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम शासनाने केले आहे. त्यामुळे नवीन नियम आणि निकष तात्काळ रद्द …