प्रतिनिधी : रोहित पास्ते
मलकापूर येथील सुभाष रोड परिसरातील रहिवासी श्री. आनंदराव बंडू पाटील यांनी त्यांच्या घरासमोरील विद्युत डांब (इलेक्ट्रिकल पोल) पूर्णपणे खराब झाल्याने तो तातडीने बदलण्याची मागणी महावितरणकडे केली आहे.

याबाबत महावितरणच्या राज्य अभियंता कार्यालय, मलकापूर यांना निवेदन देण्यात आले असून, संबंधित डांब वाकलेला व धोकादायक स्थितीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विद्युत डांब तात्काळ बदलण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.



