शिरोळ : महापूर, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाला असून, शासनाने शेतकऱ्यांची मागील शेतीपंपाची वीज बिले, पीक कर्जे माफ करावीत, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य पृथ्वीराजसिंह यादव यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन पाठवले आहे. जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, …
शेतकऱ्यांची पीक कर्जे माफ करा : पृथ्वीराजसिंह यादव यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी