जयसिंगपूर : प्रतिनिधीरत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, याच महामार्गासाठी इतर ठिकाणी चौपट दराने मोबदला शेतकऱ्यांना अदा केला आहे, परंतु अंकली ते चोकाक या ३३ किमी अंतरातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दर मिळत देणार असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. एकाच महामार्गावरती अधिग्रहण केलेल्या जमिनींना वेगवेगळे दोन दर दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून विविध गावांमध्ये आंदोलने …
चौपट दराप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेणार : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती