दिवसभरात घेतल्या मान्यवरांच्या भेटी गाठी..लोकसभा निवडणूकीचा रंग जसा चढू लागला आहे. तशाच पध्दतीने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनीही जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्याचे सुरु केले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी सकाळपासूनच इचलकरंजी शहरात वैयक्ति भेटीगाठींवर भर दिला होता. त्याचबरोबर सार्वजनिक मंडळे, संघटना, समाजबांधव महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेऊन आपल्या उमेदवारीचे समर्थन करत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन ते करत होते.खासदार माने …
धैर्यशील माने इचलकरंजीत तळ ठोकून…