दि १३ एप्रिल २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे, माघार घेण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे परंतु शुक्रवारपासून केवळ दुपारी तीननंतरच प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी तीन ते सहा दरम्यान नागरिकांना प्रशासकीय कामासाठी प्रवेश दिला जाईल. केवळ दहा दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या दोन्हींसाठी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातच दाखल करावे …
जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना दुपारी तीननंतरच प्रवेश