देशात पुन्हा एकदा कोरोना चा धोका वाढू लागला आहे. दररोज ३००० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. दिल्ली एवनसीआर मध्ये दिवसाला ५०० हुन अधिक रुग्ण सापडत आहेत. तर हरियाणा मध्ये १०० हुन अधिक लोकसंख्या असलेल्या भागात मास्क सक्ती केली आहे. महाराष्ट्राच्या साताऱ्या जिल्ह्यात कॉलेज आणि बँकांत मास्क सक्ती केली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असलेले पाहून काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी आपल्याला सतर्क राहण्यास सांगितले आहे. परंतु घाबरण्याचे काहीही कारण नाही असेही सांगितले आहे.


