राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ गटाने आघाडी घेतली आहे. अर्ज छाननी मध्ये कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणारे आघाडीचे तब्बल 29 उमेदवार अपात्र ठरले होते. सत्तारूढ गटाने शासकीय यंत्रणेवर दबाव टाकून हे उमेदवारी अर्ज अपात्र ठरवल्याचा आरोप विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला होता. या विरोधात त्यांनी प्रादेशिक साखर संचालकांकडे तक्रार केली होती. …