Home राजकारण डिवायच्या शिल्लक सभासदांमध्ये निम्म्याहून अधिक बोगस – डॉ. किडगावकर यांचा आरोप

डिवायच्या शिल्लक सभासदांमध्ये निम्म्याहून अधिक बोगस – डॉ. किडगावकर यांचा आरोप

4 second read
0
0
628

सतेज पाटील यांच्या डी.वाय.पाटील साखर कारखान्यामधल्या शिल्लक राहिलेल्या 2213 सभासदातील निम्म्याहून अधिक नावे बोगस असल्याचा खळबळ जनक आरोप राजाराम कारखान्याचे मा.संचालक डॉ. किडगावकर यांनी केला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित आळवे गावातील सभासदांच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.

राजाराम कारखान्याच्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या आणि वारंवार राजारामच्या सभासदांना बोगस म्हणणाऱ्या सतेज पाटील यांच्या स्वतःच्या डीवाय कारखान्यातील बरेचसे सभासद बोगस आहेत.

डिवाय कारखान्याचे अनेक सभासद कारखाना कार्यक्षेत्रातील मांडुकली गावचे रहिवासी दाखवले आहेत, पण प्रत्यक्षात ते कसबा बावड्याचे रहिवासी आहे. मूळ कार्यक्षेत्रातील सभासद कमी करून असे आणखी किती सभासद यांनी बोगस लावले आहेत? हे त्यानी जाहीर करावं असं आव्हान डॉ. किडगावकर यांनी दिलं. सभासदांचे हक्क खाणाऱ्यांना आता रोखायला हवं अशा शब्दात त्यांनी विरोधी आघाडीचा समाचार घेतला.

यावेळी बोलताना अमल महाडिक यांनी, सर्वोच्च न्यायालयात जाऊन आम्ही सभासदांचे हक्क आणि अधिकार अबाधित राखले याचाच विरोधकांना पोटशूळ असल्याचं सांगितलं. काहीही झालं तरी राजाराम कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहील याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

—————————–जाहिरात —————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…