पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि कोडोली व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी यांनी “तणावमुक्त व्यापार – समृद्ध भारताचा आधार” या विषयावर मार्गदर्शन केले. व्यापार करताना मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असून, ही एकाग्रता साधण्यासाठी राजयोग ध्यान प्रभावी ठरते, …