उमद्या नेतृत्वाच्या जाण्याने चळवळीची हानी होते.हे निश्चित आहे. मात्र, दुःखाला कवटाळून बसलोत तर पोकळी अधिकच वाढेल. त्यामुळे प्रा.काँ.सुभाष जाधव यांच्या विचारांची उर्मी घेऊन प्रत्येकाने डाव्या चळवळीसाठी योगदान देणे हीच खरी त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल असे आवाहन काँ. माया पंडित यांनी केले.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व ऊसतोडणी कामगार संघटनेचे नेते प्रा.काँ. सुभाष जाधव यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, …