शाहूवाडी तालुक्यातील मौजे करुंगळे येथील लोहार वाडीतील धोका दायक विजेचा पोल, महावितरण वीज कंपनी कडून दुर्लक्षित होता. वारंवार तक्रार करून देखील पोल बदलत नव्हते. परंतु वाडीतील ग्रामस्थांनी भाजपा नेते आबासाहेब पाटील यांच्याकडे थेट तक्रार केल्याने, आबासाहेब पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

हा धोकादायक पोल पडल्या नंतर, दुर्घटना घडल्या नंतर पोल बदलणार आहात का? आबासाहेब पाटील यांच्या सूचने नंतर आठ दिवसात विजेचा पोल बदलण्यात आला. लोहारवाडीतील ग्रामस्थांकडून आबासाहेब पाटील यांचे आभार मानन्यात आले.



