Home Uncategorized शिरोळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने स्वाभिमानीच्या विजयाचा मार्ग सुकर : पदाधिकाऱ्यांनी घेतली राजू शेट्टींची भेट

शिरोळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने स्वाभिमानीच्या विजयाचा मार्ग सुकर : पदाधिकाऱ्यांनी घेतली राजू शेट्टींची भेट

3 second read
0
0
76

शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वाभिमानीचे उमेदवार श्री. उल्हास पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचे प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिरोळ विधानसभेसाठी स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर आज जयसिंगपूर येथील स्वाभिमानीच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन प्रचार यंत्रणा गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि दलित चळवळ व शेतकरी चळवळ एकत्र यावी ही स्वर्गीय शरद जोशी यांचे स्वप्न होते आज शिरोळ तालुक्यातून या ऐतिहासिक गोष्टीस सुरवात झाली आहे. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे सामान्य कुटूंबातील लोक देशाच्या सर्वोच्य सभाग्रहात पोहचले आहेत. वंचित व शोषित लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी व वंचित आघाडी एकत्र आल्यास त्याचा लाभ सामान्यांना होणार आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम , तालुकाध्यक्ष संदीप कांबळे , उपाध्यक्ष दिलीप कांबळे , किरण कांबळे , जीवन आवळे, गौतम कांबळे , गजानन धनवडे , संदीप कांबळे , अजित कांबळे , सुशांत कांबळे , प्रमोद मळगे , निखील कांबळे सुनिल सुपेकर , शितल कांबळे , अविनाश गोपाळे , संतोष कांबळे , यल्लापा नाईक, बिरू कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानीचे पदाधिकारी ऊपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

शिरोळ : प्रतिनिधी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्…