
राधानगरी येथील नदी काठावर जाणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या बाजूच्या चौक नावाच्या क्षेत्रातील उसाच्या फडाला दुपारी बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीमध्ये ऊस शेतकरी शिवाजी टिपुगडे, शहाजी पाटील,हर्षद पाटील या शेतकऱ्याचा 5 एकरातील ऊस जळून गेला असून सुमारे लाखोंचे नुकसान झाले आहे. ही बातमी केके न्यूज च्या माध्यमातून काल प्रसारित करण्यात आल्यानंतर युवा नेते अभिषेक डोंगळे यांनी यांची दखल घेऊन सदर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली व संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर भरपाई मिळावी यासंबंधीचे निवेदन देण्यात आले.कोल्हापुरी कारभारासाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे


