Home राजकारण महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात वयाच्या 89 व्या वर्षी निधन

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात वयाच्या 89 व्या वर्षी निधन

13 second read
0
0
689

महात्मा गांधी यांचे नातू लेखक अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरातील कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्प, अवनी संस्था, नंदवाळ (वाशी) कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी सांगितले कि अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांचे पुत्र तुषार गांधी कोल्हापुरला येण्यास निघाले आहेत.


अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. १४ एप्रिल १९३४ रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात सक्रिय होते. अरुण गांधी यांनीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी ‘द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’ हे त्यांचे प्रमुख पुस्तक आहे. अरुण गांधी १९८७ मध्ये त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी Christian Brothers विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली.

https://kknewss.com/weblogin
https://kknewss.com/weblogin
https://kknewss.com/weblogin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…