
शिवाजी पेठेच्या शिवजयंतीची परंपरा गेली ८४ वर्ष चालू आहे.संस्थापक वस्ताद दिनकरराव शिंदे यांनी घालुन दिलेली परंपरा माजीआमदार स्व.पी.बी.साळुंखे,स्व.सखाराम खराडे ,महिपतराव बोंदरे,रामभाऊ चव्हाण,विष्णुपंत इंगवले,बबनराव कोराणे,देवासराव सूर्यवंशी,आदी मंडळीनी पुढे चालवली.पेठेतील या दिवंगत मंडळींनी घालून दिलेली परंपरा नव्या पिढीने पुढे चालू ठेवावी .असे आवाहन अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी केले..सेक्रेटरी महेश जाधव यांनी शिवाजी पेठेचा एकसंघपणा केवळ शिवजयंती पुरताच न ठेवता तो फुटबॉल मैदानावरही खिलाडूवृत्तीने रहावा..असे आव्हाहन शिवजयंती उत्सवनिमित्त बोलवण्यात आलेल्या पेठेतील शिवप्रेमी नागरिकांच्या बैठकीत केले .
प्रास्ताविक संचालक लालासाहेब गायकवाड यांनी केले आभार रविन्द्र साळोखे यांनी मानले.यावेळी राजेंद्र चव्हाण,श्रीकांत भोसले, केशवराव जाधव पंडीत बोंदरे,चंद्रकांत यादव सुरेशगायकवाड चंद्रकांत सूर्यवंशी विजय माने राजेंद्र सरनाईक चंद्रकांत जगदाळे मोहन सालोखे याशिवाय रामभाऊ सालोखे विशाल बोंगाळे संजय कुऱ्हाडे शिवाजीराव जाधव रोहितमोरे दिलीप सावंत शरद नागवेकर पेठेतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते .


