
कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन आता गर्दीचे दिवस वगळता पुन्हा पितळी उंबऱ्याच्या आतून घेता येणार आहे. तीन वर्षानंतर आज मंगळवारपासूनच (ता. २९) देवीचे जवळून दर्शन घेता येणार आहे. कोरोना काळात गाभाऱ्यातून दर्शन बंद केले होते. तरी सध्या दर्शन पूर्ववत करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. मंदिर परिसरातील भाविकांसाठी उभारलेल्या स्वछतागृह आणि चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्र कामाच्या उद्घाटनानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.


