कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांचा मूळ जलजीवन मिशन आराखड्यात समावेश नव्हता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या गावांचा आराखड्यात समावेश करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या गावांमध्ये काही दुर्गम गावांचाही समावेश होता. या पत्राची दखल घेत मंत्री महोदयांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 39 गावांचा मूळ आराखड्यात समावेश केला. शाहुवाडी पन्हाळा करवीर आजरा …
कोल्हापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत समाविष्ट 39 गावांना माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांतून तब्बल 60 कोटींची प्रशासकीय मान्यता