छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारार्थ कणेरी, कणेरीवाडी गावांमध्ये माजी आमदार अमल महाडिक यांचा दौरा पार पडला. यावेळी सभासदांच्या बैठका घेत त्यानी सभासदांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कारखान्याच्या सुज्ञ सभासदांना राजारामच्या वजन काट्यावर पूर्ण विश्वास आहे. अगदी कुठल्याही काट्यावर वजन करून ऊस घातला तरी किलोचाही फरक आढळणार नाही. विरोधकांनी आरोप केला असेल मात्र त्यांच्या कारखान्याप्रमाणे आपल्याकडे १२०० किलोचा …