
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ हे पुणे दौऱ्यावर होते. पुणे येथे सुरू असलेल्या ‘आयुर्वेदाचे भवितव्य’ 2050 ही पाचवी राष्ट्रीय परिषद पर्वती येथे आयुर्वेद रिसर्च असोसिएशन यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र आरोग्य शास्त्र विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय परिषद पार पडली.
या परिषदेला हसन मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमानंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी मात्र मुश्रीफ यांना आता ईडीची जी टांगती तलवार आहे यावरती खडा सवाल विचारला..?

ईडीचं संपलं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, हसन मुश्रीफ म्हणाले, ” सहा महिने आधी मला, न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यावरती बोलण्यात मला सार्थ वाटत नाही. “असे प्रतिउत्तर मुश्रीफ यांनी दिले.


