राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी प्रचाराची मर्यादा ओलांडली असून राजाराम कारखाना प्रशासनाची नाहक बदनामी चालवली आहे, असा आरोप मा.आ. अमल महाडिक यांनी केला. कडवे ता.शाहूवाडी येथे त्यांनी आज सभासदांशी संवाद साधला. सुट्टीच्या दिवशी तसेच रात्री-अपरात्री कार्यालयात येऊन गोंधळ घालण्याचे प्रकार विरोधकांकडून होत आहेत, यावर कळस म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात कारखाना प्रशासनाविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. कारखाना प्रशासनाने खोटी माहिती …