महाडीकांचे नातेवाईक असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या नावावर शेती आहे, मग त्यांच्या घरात अकरा सभासद कसे? असा सवाल उचगावचे माजी सरपंच कावजी कदम यांनी केला. छ. राजाराम कारखाना निवडणूक प्रचारार्थ परिवर्तन आघाडीच्यावतीने उचगाव येथे आयोजित सभासद संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती. कावजी कदम यांनी आपल्या भाषणात महाडिकांच्या अजब कारभाराचा पाढा वाचला. महाडिकांनी 28 वर्षे …